Patan Daily

Patan Daily

Share

02/02/2026

आज कराड येथील प्रीतिसंगम येथे राज्याच्या उपमुख्यमंत्री मा. श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राचे शिल्पकार आणि पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यासोबतच सन्मानीय वेणुताई यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिप्रित्यर्थ बांधण्यात आलेल्या स्मारकास भेट देत, स्व. यशवंतराव चव्हाण साहेब व वेणुताई चव्हाण यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचे आणि स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळाचे नाते अत्यंत भावनिक व वैशिष्ट्यपूर्ण होते.अजितदादा अनेक वेळा कराड येथे येऊन स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीचे दर्शन घेत, महाराष्ट्राच्या भाग्यविधात्यासमोर नतमस्तक होत व त्यांच्या प्रेरणेतून समाजाभिमुख कार्यास गती देत होते.

याप्रसंगी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष तथा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष सौ. रुपाली चाकणकर, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री श्री. मकरंद आबा पाटील, खासदार श्री. नितीन पाटील, माजी खासदार श्री. श्रीनिवास पाटील, माजी मंत्री श्री. बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी श्री. संतोष पाटील, पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी, कराडचे नगराध्यक्ष श्री. राजेंद्रसिंह यादव यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

26/06/2025

भक्तिमय वातावरणात माऊलींचे दत्त घाटावरील नीरा नदीत स्नान.
माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन;चार दिवस मुक्काम.
सातारा दि. २६
ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याला परंपरेची किनार आहे.दरवर्षी लाखो वारकरी या सोहळ्यात नि:स्वार्थ भावनेने सहभागी होऊन पंढरीच्या दिशेने चालत असतात वैष्णवांचा हा मेळा गुरुवारी सातारा हद्दीत दाखल झाला.वारकरी संप्रदायासाठी वारी म्हणजे केवळ प्रवास नव्हे ती श्रद्धेची आणि आत्मशुद्धीची वाटचाल आहे.याच वाटचालीतला क्षण म्हणजे माऊलींचे निरा स्नान गुरुवारी दुपारी नीरा दत्त घाटावर माऊलींनी स्नान केले.
टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात मोठ्या आनंदाने आणि भक्तीमय वातावरणात फडफडणाऱ्या भगव्या पताका, टाळ मृदुंगाचा गजर आणि हरिभजनात तल्लीन होऊन संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा भक्तीरसात चिंब न्हाऊन निघाला.
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन होताच जिल्ह्याच्यावतीने पालकमंत्री शंभूराज देसाई,ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील,खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले,खासदार नितीन पाटील,आमदार सचिन पाटील,आमदार मनोज घोरपडे,माजी खासदार रणजीतसिंह नाईक- निंबाळकर, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पूलकुंडवार, जिल्हाधिकारी संतोष पाटील,मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी वाईचे प्रांतअधिकारी राजेंद्र कचरे यांनी पुष्प अर्पण करुन व पोलीस बँड पथकामार्फत विविध धून वाजून स्वागत केले.
नीरा नदीतील स्नानानंतर संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यातील पाडेगाव येथे मान्यवरांनी तसेच लाखो भाविकांनी दर्शन घेतले. माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2025 निमित्त वारकऱ्यांच्या सेवेसाठी गावनिहाय सुविधा माहिती व लोकेशन मार्गदर्शनाचा क्यूआर कोड पंचायत समिती खंडाळा व फलटण यांनी उत्कृष्ट पद्धतीने पहिल्यांदाच तयार केला आहे. याद्वारे वारकऱ्यांच्या सोयीसाठी काही गावांमध्ये अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.या माध्यमातून प्रत्येक गावातील शौचालय, आरोग्य सेवा,पाणी, महिला स्नानगृहे, मुक्काम, निवास, पेट्रोल पंप व संपर्क माहिती मिळत आहे, त्यामुळे डिजिटल वारीचा अनुभव वारकऱ्यांनी घेतला.
प्रशासनाने वारकऱ्यांसाठी ठिकठिकाणी पिण्याचे पाण्याचे टँकर,आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत.तसेच जागोजागी स्वच्छतागृहांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.वारकऱ्यांच्या सुरक्षेतेसाठी चोख पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.
चौकट.....
आज माऊलींचा पालखी सोहळा लोणंद नगरीत विसरणार आहे.शुक्रवारी (२७) चांदोबाच लिंब येते वारीतील पहिला उभा रिंगण सोहळा होणार आहे तर मुक्काम तरडगाव येथे होणार आहे.शनिवारी (२८) काळज,निंभोरे,वडजल असा पाहुणचार घेत हा सोहळा फलटण मुक्कामी राहील. रविवारी (२९) सकाळी विडणी,पिंपरद, निंबळक फाटा करत बरड येथे मुक्कामी पोहोचणार आहे.
सातारा जिल्ह्यातील चार दिवसांच्या पाहुणचारा नंतर सोमवारी धर्मपुरी सोलापूर जिल्ह्यात माऊलींचा प्रवेश होणार आहे.

17/03/2025

पुणे, ता. १७ ; भारती प्रतापराव पवार (वय ७७ वर्षे) यांचे सोमवारी सायंकाळी दीर्घआजाराने निधन झाले. ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्यामागे मुलगा ‘सकाळ’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजीत पवार आणि मुलगी अश्विनी, सून, नातवंडे असा परिवार आहे. भारती पवार यांच्या पार्थिवावर मंगळवारी (ता. १८) पुण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत.

भारती पवार या पूर्वाश्रमीच्या भारती श्रीपतराव पाटील होत. मूळच्या मुंबईतील असलेल्या भारती यांचे बालपण शिवाजी पार्क परिसरात गेले. त्यांचे शालेय शिक्षण तेथील बालमोहन विद्या मंदिरात झाले. रुईया महाविद्यालयातून त्यांनी कला शाखेची पदवी घेतली. चित्रकलेत त्यांचा हातखंडा असल्यामुळे पुढे त्यात त्यांनी पदव्युत्तर पदवी घेतली. त्यानंतर १९७० मध्ये त्यांचा प्रतापराव पवार यांच्याशी विवाह झाला.

सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे पुण्यात आल्यावर ‘सकाळ’च्या माध्यमातून त्या अनेक उपक्रमांत सहभागी होत. औंधजवळील बालकल्याण संस्थेमध्ये त्या सुमारे ३५ वर्षे सक्रिय होत्या. तेथे त्या विश्वस्तही होत्या. बालकल्याण संस्थेतील प्रत्येक उपक्रमात त्या सहभागी होत. अनेक मुला-मुलींना त्यांनी तेथे चित्रकलेचे धडे दिले. तेथील अधिकारी, कर्मचाऱ्यांशीही त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. तसेच ‘सकाळ’ संचलित कोरेगाव पार्क आणि कोथरूड येथील अंधशाळेतही त्या विश्वस्त होत्या. तेथील अनेक उपक्रमांत त्या सहभागी होत.
--------------

Want your business to be the top-listed Media Company in Satara?
Click here to claim your Sponsored Listing.

Address


Patan
Satara
415206