Palakatva
Whether you are an individual seeking support, a business interested in partnership, or a community leader eager to make a difference, there is
कोरोना विरुद्ध लढण्यासाठी आपल्याकडे आहे काय?
1. संयम
2. रोगप्रतिकार शक्ती
3. औषधोपचार
4. इतर पर्याय
पाहूया.....
अस म्हणतात की, या पंचत्त्वांपासून मानवी शरीराची उत्त्पती झाली आहे. असे असेल तर सृष्टीच्या या पाच तत्वांचा समतोल बिघडल्यास जीव सृष्टीला धोका आहे हे नक्की होते. हे सर्व माहित असून ही आज कोरोनाविरुद्धच्या लढाईत माणूस नेमक काय करतो आहे. पाहणे गमतीशीर आहे.
मानवी विकासाच्या नावाखाली प्रदुषणाचा डोंगर उभा करणारा माणूस आज स्वत:ला कोरोना पासून कसं वाचवायचं, त्यानंतर कसं जगायचं आणि आर्थिक विषमता कशी दूर करायची यामध्ये गुरफटून गेला आहे.
डॉक्टर म्हणतात, औषध शोधले जाई पर्यंत लोकांनी आपल्या जीवन शैलीमध्ये बदल करायला हवा. जसे की, मास्क वापरा, हात साबणाने स्वच्छ धुवा, प्रत्येकामध्ये ३ फुट अंतर ठेवा, रोग प्रतिकार शक्ती वाढवा, प्राणायम-योगा करा, मानसिक स्वास्थ चांगले ठेवा इत्यादी. याच गोष्टींचे पालन करण्यासाठी जगातील प्रत्येक शासन लोकांना घरातून बाहेर पडू देत नाही. हे सर्व उत्तम आहे. पण काय हे पुरेसे आहे?
जिथे माणसला जगविणाऱ्या पृथ्वीची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत झाली आहे तिथे माणसाची रोग प्रतिकार शक्ती किती तग धरेल? त्यापुढे जाऊन पाहूया आपल्याकडे आज ही माहिती नाहीये की, आपल्या एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के लोकांची रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे. आपल्याकडे बहुतेक लोक हे फक्त जगण्यासाठी अन्न खात असतात. तेच अन्न त्यांना मिळेल की नाही असा प्रश्न असताना रोगप्रतिकार शक्ती सारख नाटक त्यांनी कसे कराव?
आज आपण मागील ३०-४० दिवसात ढासळलेली अर्थ व्यवस्था पुन्हा उभारण्यासाठी उद्योग-धंदे कसे चालू करता येतील यावर विचार विनिमय करत आहे. असे केले नाही तर कोरोना होऊ न होऊ लोक उपासमारीने किंवा अन्य कारणाने मरतील. हे सगळ बरोबर आहे... पण काय निसर्गाची रोग प्रतिकार शक्ती आपण चांगली ठेवली असती तर आज हे सर्व प्रश्न निर्माण झाले असते का?
ज्याप्रमाणे मानवी रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी काम केले गेले पाहिजे असे म्हणतो त्याउलट आपण जर निसर्गाची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी निसर्गाला सहकार्य करूया असे म्हटल्यास आपोआपच मानवी रोगप्रतिकार शक्ती वाढेल हे नक्की.
परंतु, हे करायचे कसे....?
हवा आणि पाणी प्रदूषण काहीही झाले तरी होणार नाही यासाठी कडक धोरण आखणे व प्रत्यक्षात उतरविणे.
नैसर्गिक साधन संपत्तीचे चक्र तसेच लोकसंख्या व्यवस्थापन व त्यांचे आरोग्य या गोष्टी विचारात घेऊन/समजून घेऊन त्याआधारे उद्योग धंद्यांचे नियोजन करणे.
आज जर या गोष्टींचा कोणताही विचार न करता आहे तसेच सर्व उद्योग धंदे पुन्हा चालू केल्यास आपणच आपल्या मृत्यूस जबाबदार आहोत असेच म्हणावे लागेल.
06/02/2019
आपल्या राष्ट्रातील कलेला अजून समृद्ध करण्यासाठी येणार्या पिढीला कलेचे बाळ कडू देण्याची प्रत्येक कलाकाराची जबाबदारी आहे. त्याच गोष्टीला लक्षात घेऊन, आम्ही केलेला हा एक छोटासा प्रयत्न आहे. Ganesh K Kalaskar
Click here to claim your Sponsored Listing.
Contact the school
Telephone
Website
Address
Pune
415004