TBW VLOGS
"देव सगळ्यांचा, पण दर्शन काही निवडकांचं?"
देव म्हणजे श्रद्धा. देव म्हणजे आश्रय. आणि देव म्हणजे तो एकच, जो गरीब-श्रीमंत, मोठा-छोटा असा कोणताही भेद करत नाही. पण देवदर्शनाच्या ठिकाणी मात्र अशीच समता का दिसून येत नाही?
कोल्हापूरची अंबाबाई असो, जेजुरीचा खंडोबा असो की भीमाशंकरचा बाप्पा — या ठिकाणी लाखो भक्त दररोज येतात, तासनतास रांगेत उभे राहतात. ऊन, पाऊस, थकवा, वयोमानाची मर्यादा सगळं झेलत एकच आस धरून येतात – देवाचं दर्शन होवो. पण हेच सामान्य लोक मागे राहतात. आणि नेते, अधिकारी, कार्यकर्ते, राजकारणी, बड्या मंडळींसाठी मात्र 'स्पेशल' पास, डायरेक्ट प्रवेश, एअर कंडीशन कक्ष, आणि आरत्या पुढून अनुभवायची 'सुविधा' मिळते.
हीच काय ती ‘लोकशाही’?
हीच काय ती ‘समता’?
या 'पासधारकां'साठी खास दरवाजे उघडले जातात, एजंटमार्फत सीधं गर्भगृहात प्रवेश मिळतो. आणि याच वेळी, सामान्य माणूस – जो महिनाभराचं बजेट बांधून, किराणा कमी करून, पोरांचं खाऊ कापून यात्रा करायला निघतो – तो बाहेर उन्हात, गर्दीत, घामाने भिजून, धक्के खात उभा असतो.
हे पाहून देवही गोंधळला असेल...
तो ज्याने सर्वांना समान मानलं, त्याच्या दर्शनासाठी अशी विषमता?
मग हा "देवभक्तीचा बाजार" नाही का?
एका बाजूला वृद्ध आईवडील, पाठीवर लेकरं घेतलेली आई, अपंग माणसं, पायावर उभं राहणं ज्यांच्यासाठी कठीण – हे लोक 4-5 तास रांगेत उभे, आणि दुसऱ्या बाजूला नेते मंडळींची गाड्या थेट मंदिरात.
समाजाला आता आरसा दाखवण्याची वेळ आली आहे.
कुठे आहे सेवा?
कुठे आहे भक्तीमधील समता?
कुठे आहे मंदिर समित्यांची जबाबदारी?
देव सगळ्यांचाच आहे. मग त्याचं दर्शन सगळ्यांना सारखंच का नाही? मंदिर प्रशासनाने ठराविक व्हीआयपी पास असेल, तरी ज्येष्ठ नागरिक, महिलांसाठी, दिव्यांगांसाठी विशेष सुलभ रांग असावी. 'एजंटमार्फत दर्शन' हे प्रकार बंद व्हावेत. मंदिर म्हणजे आत्मिक उन्नतीसाठी जागा, कोणाचं राजकारणाचा अड्डा नाही.
समाज बदलायचा असेल, तर प्रश्न विचारायला शिका.
अशा अन्यायाविरुद्ध आवाज उठवा.
स्थानिक प्रशासनाला पत्र लिहा.
सोशल मीडियावर चळवळ उभारा.
आणि सर्वात महत्त्वाचं – स्वतः पुढाकार घ्या.
कारण देव सर्वांचा आहे –
त्याच्या घरात कोणालाही विशेष वागणूक नसावी.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Pune