MNS.Kolhapur

MNS.Kolhapur

Share

07/10/2022

पुणे-मुंबई महामार्गावर वाढलेल्या
अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराला अटकाव करा

मनसे नेते जयराज लांडगे यांची मागणी

पुणे ः पुणे-मुंबई महामार्गावर अंमली पदार्थांचा अवैध विक्री, व्यवसाय आणि वापर वाढला आहे. वाकड, बाणेर, हिंजवडी आदी परिसर या अवैध धंद्यांचा अड्डा बनला आहे. त्यामुळे परिसरातील महाविद्यालयांमध्ये उच्च शिक्षण घेणारे राज्यातील आणि राज्यबाहेरील विद्यार्थी या विळख्यात सापडत आहेत. त्यामुळे या अवैध धंद्यावर तत्काळ कारवाई करावी आणि ही संपूर्ण यंत्रणा उद्धवस्त करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनहित संघटनेचे नेते जयराज लांडगे यांनी पुणे पोलिसांकडे केली आहे.
जयराज लांडगे म्हणाले, वाकड, बाणेर, हिंजवडी परिसरात अवैध धंदे वाढले आहेत. विशेषकरून अंमली पदार्थांचा अवैध व्यापार, विक्री आणि वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मुंबई-पुण्यावरून वाहतुकीला सोयीचे ठिकाण, तत्काळ ये-जा करणे शक्य, महामार्गालगत वाढत्या शैक्षणिक संस्थांमुळे परराज्यातील विद्यार्थ्यांची मोठी संख्या आणि परिसरातील गुंठा मंत्री आदींमुळे हा व्यवसाय तेजीत आला आहे. येथील अनेक विद्यार्थांचे आयुष्य वाया गेले आहे. स्थानिक तरुणही व्यसनाच्या आहारी गेले आहेत. परिसरातील सामाजिक स्वास्थ अडचणीत आले आहे. त्यामुळे वाकड, बाणेर, हिंजवडी आदी परिसरात सुरू असलेला अवैध अंमली पदार्थांचा व्यवसाय तत्काळ थांबवावा, अशी मागणी लांडगे यांनी केली आहे.

Photos from MNS.Kolhapur's post 16/06/2022

मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूरकराचा पुरोगामी निर्णय

दरवर्षी वाढदिवसानिमित्त होणार विधवा महिलांचा हळदी-कुंकवाचा कार्यक्रम

कोल्हापूर जिल्हा मनसे संपर्क प्रमुख जयराज लांडगे यांच्या पुढाकारातून शाहू महाराजांच्या भूमीत पुन्हा समाज सुधारणांचा हुंकार…

कोल्हापूर :
यंदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आणि वट पौर्णिमा एकाच दिवशी येण्याचा योग जुळून आला होता. या निमित्त
पन्हाळा तालुका अध्यक्ष विशाल मोरे व त्यांची पत्नी हर्षदा यांनी समाजातील अनिष्ट रूढी परंपरांना झुगारून देत विधवा महिलांच्या हस्ते वडाची झाडे लावून त्यांची पूजा केली. विधवा महिलांसाठी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम घेऊन त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करून दिली. हा कार्यक्रम राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी आयोजित करण्याचा संकल्प मोरे दाम्पत्याने केला आहे. कोल्हापूर जिल्हा मनसे संपर्क प्रमुख जयराज लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा पुरोगामी उपक्रम राबविण्यात आला.

अनेक वर्षांतून हळदी कुंकवाचा मान मिळाल्यामुळे विधवांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. हा एक अत्यंत भाऊक क्षण होता. शहीद संग्राम पाटील यांच्या पत्नी हेमलता संग्राम पाटील यांचाही हळदी कुंकू लावून सन्मान करण्यात आला. श्री घोरपडे यांचे पती जाऊन 14 वर्षे झाली परंतु त्यांनी मंगळसुत्र काढले नाही, कुंकू पुसले नाही. त्यांनी खंबीर भूमिका घेतल्या बद्दल या वेळी त्यांचाही सन्मान करण्यात आला.

विधवा महिलेने हिरवी साडी नेसायची नाही, तिने मंगळसूत्र घालायचं नाही, तीचं कुंकू पुसायचं, बांगड्या फोडायच्या, तिला कोणत्याही शुभ प्रसंगात सहभागी होण्याचा अधिकार नाही, त्यांना धार्मिक, सांस्कृतिक, शुभ कार्यक्रमात सहभागीच करून घेतलं जात नाही, समाजात तिला मानसन्मान दिला जात नाही नाही. अस का तर फक्त तिच्या नवऱ्याचे निधन झाले म्हणून? मग त्यात तिचा काय दोष?
मग विधवा महिलांचे मूलभूत स्वातंत्र व अधिकार हिरावून घेण्याचा कुणी दिला या समाजाला अधिकार? किती दिवस हे चालणार? तिच्या मनाचा कधी विचार होणार आहे का नाही? असे प्रश्न उपस्थित करून हर्षदा मोरे यांनी विधवा महिलांचे प्रबोधन केले. विधवा प्रथा हद्दपार करण्यासाठी राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित करण्याचा संकल्प करण्यात आला.

या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका उपाध्यक्ष अमर बचाटे, कामगार सेना जिल्हा उपाध्यक्ष मोहन शेळके महिला तालुका अध्यक्ष शुभांगी पाटील, शिवाजी मोरे, ईतर मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Want your organization to be the top-listed Government Service in Poona?
Click here to claim your Sponsored Listing.

Website

Address


Poona