Yuva Rashtrawadi Worli

Yuva Rashtrawadi Worli

Share

29/09/2019

पवार साहेबांवरती ई. डी ची कारवाई होत आहे ती योग्य आहे का? भाजप जाणून बुजून घाबरून कारवाई करत आहे असा तर वाटत नाही ना? आपल मत मांडा युवा कार्यकर्त्यानो.

Photos 31/07/2017

*मान. सचिन भाऊ अहिर* व *सौ. संगिता वहिनी* श्रावण सोमवार निम्मित मार्कंडेश्वर मंदिर येथे येऊन पुजा केली.
- विनोद खोब्रागडे, वॉर्ड अध्यक्ष 197
💐💐💐💐💐💐💐

Photos 09/02/2017

वॉर्ड क्र. १९६ चे राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार तसेच वरळीतील थोर समाजसेवक श्री. माननीय दशरथ दादा नितनवरे मुंबई महानगरपालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीमध्ये उतरले आहेत. राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष, माननीय श्री. सचिनभाऊ अहिर आणि आमचे वॉर्ड १९६ चे वरळीतील उगवते नेतृत्व श्री. अमोलदादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दशरथ दादा नक्कीच निवडून येतील.

वरळीचे लाडके नेते म्हणून प्रसिद्ध असे दशरथ दादा यांना आपण भरघोस मताने जिंकून आणावे. वरळीमध्ये फक्त राष्ट्रवादी म्हणजे राष्ट्रवादीचं. यंदा वरळी वॉर्ड क्र. १९६ मध्ये फक्त राष्ट्रवादी फडकणार आणि झळकणार .

शौर्य प्रतिष्ठान आणि समस्त वरळी मतदार संघातर्फे आपणास पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

Photos 07/11/2016

लक्ष्य २०१६ मुंबई महानगरपालिका निवडणूक .
वरळीतील उगवते नेतृत्व श्री. अमोलदादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली.
यंदा वरळी वॉर्ड क्र. १९६ मध्ये फक्त राष्ट्रवादी फडकणार आणि झळकणार .

शौर्य प्रतिष्ठाण तर्फे अमोल दादांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
आम्ही प्रचंड आशावादी, आम्ही सर्व राष्ट्रवादी!

Photos 23/08/2016

महापालिकेच्या ढिसाळ प्रशासनामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात - सचिन अहिर.

मुंबईतील डंपिंग ग्राऊंडवरील कचऱ्याची शास्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावण्याऐवजी कचऱ्याच्या दुर्गंधीवर उतारा म्हणून मुंबई महापालिका सुगंधी द्रव्याची फवारणी करणार आहे. मुंबई महापालिकेचा हा निर्णय म्हणजे 'रोग मांडीला आणि इलाज शेंडीला' अशा पद्धतीचा असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी केली आहे. कोणताही दूरगामी उपाय न करता महापालिका कचऱ्यावर सुगंधी द्रव्याची फवारणी करण्यासारखा फुटकळ इलाज करत असेल, तर महापालिका सत्ताधारी आणि प्रशासनाची किव करावी लागेल, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. सुगंधी द्रव्यासाठी तब्बल १ कोटी १५ लाखांच्या सुगंधी द्रव्याची खरेदी करण्याच्या प्रस्तावाला महापालिकेने मंजुरी दिली आहे.
उन्हाळ्यात डंपिंग ग्राऊंडवरील कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आगी लागल्याने निघणाऱ्या धुरामुळे त्रस्त असलेले नागरिक आता पावसाळ्यात कचऱ्यापासून निघणाऱ्या दुर्गंधीने त्रस्त आहेत. पावसाच्या पाण्याने कचरा कुजत असून त्यामुळे परिसरातील नागरिकांना दुर्गंधी सहन करावी लागत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. अशा वेळी ही समस्या समूळ नष्ट करण्याऐवजी महापालिकेने थातूरमातूर उपाय योजिले आहेत, अशा उपायांनी समस्या कशी सुटणार? असा संतप्त सवाल करत महापालिकेच्या निर्णयावर अहिर यांनी नाराजी व्यक्त केली.
देवनार डंपिंग ग्राऊंडवर वारंवार लागत असलेल्या आगीनंतर अहिर यांनी स्वतः त्याठिकाणची पाहणी केली होती. तसेच महापालिकेच्या डंपिंग धोरणाचा निषेध म्हणून स्थानिक रहिवाशांच्या साथीने रास्ता रोकोही केला होता. मुंबईतील कचऱ्याची समस्या शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावण्यामुळेच सुटणार असून त्यासाठी या विषयाबाबत काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांची मदत घेऊन एक कालबद्ध आराखडा आखण्याची गरज असल्याचे मत अहिर यांनी व्यक्त केले. मुंबईत कचऱ्याच्या समस्येने इतके गंभीर स्वरूप धारण केलेले असताना शेजारी असलेल्या नवी मुंबईसारख्या शहरात मात्र कचऱ्याची कोणतीही समस्या नसल्याकडेही त्यांनी यावेळी लक्ष वेधले.

Want your organization to be the top-listed Government Service in Mumbai?
Click here to claim your Sponsored Listing.

Website

Address


Worli Sea Face, Worli
Mumbai
400030