RC Fan Club
08/06/2026
इत्येषा वाङ्मयी पूजा श्रीमच्छङ्करपादयोः।
अर्पिता तेन देवेशः प्रीयतां मे सदाशिवः॥
श्री पिंपळेश्वर महादेव मंदिरभूमी संघर्षाची संकल्पपूर्ती झाल्यावर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते महापूजा करण्यात आली. हा दिवस डोंबिवली शहराच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला गेला आहे.
आपल्या भाजपा-महायुती सरकारने मंदिरासाठी ४ एकर २५ गुंठे जागा नाममात्र दरात मंजूर केली. या निर्णयामुळे १४ वर्षांपासून सुरु असलेल्या प्रशासकीय व कायदेशीर संघर्षाची फलश्रुती झाली. भगवान महादेवाच्या कृपेने शिवभक्तांच्या श्रद्धेचा ऐतिहासिक विजय झाला. या आनंददायी पार्श्वभूमीवर भगवान महादेवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
पिंपळेश्वर महादेव मंदिर : एक संघर्ष
इतिहास… श्रद्धेचा, संघर्षाचा आणि डोंबिवलीच्या अस्मितेचा!
डोंबिवलीच्या भूमीत वसलेले श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर हे केवळ मंदिर नाही, तर डोंबिवलीकरांच्या श्रद्धेचे, हिंदुत्वाच्या विचारांचे आणि सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक आहे. अनेक दशकांपासून हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या देवस्थानाने डोंबिवलीच्या इतिहासात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले.
पण या पवित्र भूमीवर संकट आले…
सन २०१२ मध्ये मंदिर परिसरातील जागेवरून वाद निर्माण झाला. तत्कालीन वरिष्ठ पोलीस अधिकारी मारी लू फर्नांडिस यांचे नाव या प्रकरणात पुढे आले आणि पिंपळेश्वर देवस्थानच्या जागेवर कब्जाचा आरोप होताच डोंबिवलीकरांच्या भावना तीव्र झाल्या.
हिंदुत्ववादी विचारांच्या डोंबिवलीकरांवर संघर्ष करण्याची वेळ आली...
संघर्ष… हिंदुत्ववादी विचारांच्या डोंबिवलीकरांचा!
हा संघर्ष केवळ जमिनीचा नव्हता…
हा संघर्ष होता श्रद्धेचा, हिंदुत्वाचा आणि डोंबिवलीच्या अस्मितेचा!
आ. रविंद्र चव्हाण, भारतीय जनता पक्ष, हिंदुत्ववादी संघटना, शहरातील मित्र मंडळ आणि असंख्य डोंबिवलीकर रस्त्यावर उतरले. मंदिराच्या भूमीसाठी जनआंदोलन उभे राहिले.
त्या वेळी आमदार Ravindra Chavan यांनी या लढ्याला नेतृत्व दिले. या सर्वांची मोट बांधून 20 ऑगस्ट 2012 रोजी डोंबिवली बंद ची हाक दिली. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी त्या दिवशी शहरात २०० हून अधिक पोलीस तैनात करण्यात आले. कारण भावना तीव्र होत्या, पण लढा श्रद्धेचा होता. आ. रविंद्र चव्हाण तसेच अनेक कार्यकर्त्यांना अटक झाली. परंतु रविंद्र चव्हाण यांच्या डोंबिवली बंदच्या हाकेला प्रतिसाद देत हिंदुत्ववादी विचारांच्या डोंबिवलीकरांनी शहर अक्षरशः बंद ठेवले.
दुकाने बंद…व्यवहार बंद…पण श्रद्धेचा संघर्ष सुरूच…
वर्षानुवर्षे चाललेल्या या संघर्षानंतर अखेर पिंपळेश्वर देवस्थानच्या न्यायाच्या लढ्याला यश मिळाले. डोंबिवलीकरांनी जपलेली श्रद्धा आणि हिंदुत्ववादी विचारांनी उभारलेला संघर्ष व्यर्थ गेला नाही.
आज तब्बल 14 वर्षाचा वनवास संपला, आणि 2026 मध्ये हिंदुहिताच रक्षण करणाऱ्या सरकार ने म्हणजेच आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींच्या मंत्रिमंडळाने पिंपळेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट ला 4 एकर 25 गुंठे जागा देऊ केली.
Click here to claim your Sponsored Listing.