PapiersnShapers
25/01/2026
Celebrating 77th Republic Day
24/01/2026
With Soumitra Pote – I just got recognized as one of their top fans! 🎉
01/01/2026
Happy New Year
02/10/2025
चला करूया सीमोलंघन
विजयादशमीच्या अनंत शुभेच्छा
चिदंबर
पेपर्स एन शेपर्स
29/09/2025
डॉ. अंजली राजेंद्र पाटील
निसर्ग संवर्धनाचे बाळकडू वडिलांकडून मिळालेल्या व लहानपणापासूनच निसर्गाची आवड असलेल्या अंजली मॅडम यांचा जन्म कोल्हापुरात झाला. त्यांचे शालेय शिक्षण होलीक्रॉस तर महाविद्यालयीन राजाराम कॉलेज आणि एम एस सी व पीएचडी ही शिवाजी विद्यापीठात झाली. वनस्पती शास्त्रामधील मायकोलॉजी अशा अवघड विषयात त्यांनी डॉक्टरेट मिळवली. आज पर्यंत त्यांनी जे काही यश मिळवले आहे त्याचे श्रेय ते शाळेतल्या शिक्षकांना व शिस्तीला देतात. निसर्ग संवर्धनाची गरज ही त्यांना सामंत सर व करकरे सरांच्या मार्गदर्शनामुळे समजली. पण या सर्व प्रवासात त्यांचे खरे आयडॉल आहेत ते त्यांचे वडील डॉ. मनसाराम पाटील सर, हे शिवाजी विद्यापीठात वनस्पती शास्त्राचे विभाग प्रमुख म्हणून काम पाहायचे. एखादा अवघड विषय स्टोरी टेलिंगच्या माध्यमातून सोपा करून शिकवणे यात पाटील सरांचा हातखंड होता. वडिलांबरोबर त्या लहानपणापासूनच बॉटनीच्या सॅम्पल कलेक्शन ला जात होत्या.
अंजली मॅडम सध्या राजाराम कॉलेज येथे वनस्पतीशास्त्राच्या विभाग प्रमुख म्हणून काम पाहतात. त्या विद्यार्थी प्रिय शिक्षिका आहेत. विद्यार्थ्यांना सतत नवनवीन गोष्टी कल्पकतेने कशा शिकवता येतील यावर त्या नेहमी काम करत असतात. त्यांच्या मते तरुणपणी झालेले संस्कार आणि लागलेली शिस्त या गोष्टी आपल्याला आयुष्यभर उपयोगी पडतात. 'वनस्पती शास्त्र हा विषय फक्त वर्गात बसून शिकण्यासारखा नाही तर वेगवेगळ्या ठिकाणी भ्रमंती करत असताना तेथे उगवलेल्या वनस्पतींचा अभ्यास करण्याचा आहे', असे त्यांचे नुसते मत नसून त्या विद्यार्थ्यांना घेऊन शनिवार /रविवारी अशा भ्रमंतीचे कार्यक्रम आयोजित करतात आणि बऱ्याच वेळेला या सर्व भ्रमंतीचा खर्च त्या स्वतःच करतात. मुलांनी भरपूर शिकलं पाहिजे असे त्यांचे मत आहे.
निसर्ग संवर्धनासाठी वृक्षारोपण अथवा व्याख्याने यातून फारसा फरक पडत नाही तर यापुढे जाऊन युवकांमध्ये संवर्धनाचा विचार खोलवर रुजवणे गरजेचे आहे. आपल्या देशातील लोकसंख्येमुळे नोकऱ्यांची कमतरता आहे. त्यामुळे स्किल बेस शिक्षण देणे गरजेचे आहे. जेव्हा एखादे शिबिर घेण्याचा प्रस्ताव येतो तेव्हा ते स्किल बेस आणि पर्यावरण पूरक आहे ना हे बघितले जाते. असा एक वेगळा विचार घेऊन अंजली मॅडमनी बरीच शिबिरे घेतलेली आहेत. त्यातील एका शिबिराबद्दल आपण जाणून घेऊ.
बांबू व बांबूच्या वस्तूंचे एक शिबिर झाले होते. यामध्ये बांबूची लागवड, बांबू कशा कशासाठी वापरला जातो, बांबूची बाजारपेठ कुठे आहे व बांबू पासून तयार होणाऱ्या वस्तू तसेच त्याची किती मागणी आहे यासारख्या अनेक आयामांचा विचार केला जातो. हे सर्व विषय प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून समजावून सांगितले जातात. तर यातून बांबूची लागवड, नवनवीन कलात्मक वस्तूंची निर्मिती, बांबू अथवा त्यापासून तयार केलेल्या वस्तूंची विक्री. असे अनेक पर्याय जेव्हा समोर येतात तेव्हा हे विद्यार्थी चौकटी बाहेरचा विचार करू लागतात असा मॅडमचा विश्वास आहे.
आपल्या विद्यार्थ्यांना यश संपादन करताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सतत प्रयत्न करणाऱ्या डॉक्टर अंजली पाटील मॅडम यांना माझे शतशः नमन.
चिदंबर नीलकंठ शिंदे
पेपर्स एन शेपर्स
कोल्हापूर
#नवदुर्गा
Anjali Patil
27/09/2025
डॉ. विदुला अरुण स्वामी.
मूळच्या साताऱ्याच्या असलेल्या डॉक्टर विदुला मॅडम या कोल्हापुर येथील के आय टी कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून 2023 पर्यंत कार्यरत होत्या. कॉलेजमध्ये शिकवत असताना नेचर क्लब मध्ये सहभागी झाल्या तिथे सुरुवातीला करकरे सर व नंतर सुहास वायंगणकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण, बर्डवॉचिंग, नर्सरी या गोष्टी सुरू झाल्या.
या सर्व गोष्टी बरेच निसर्गप्रेमी करत आहेत आपण काहीतरी वेगळे केले पाहिजे ज्यातून पर्यावरणाचे रक्षण होईल. यासाठी नवीन काय करता येईल याचा शोध सुरू होता तेव्हा सविता साळुंखे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली 'प्लास्टिक कचरा मुक्त' हा समूह तयार झाला. प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी प्रबोधनाचे वेगवेगळे कार्यक्रम हाती घेतले त्यातच सर्वात वेगळा असा उपक्रम म्हणजे स्टीलच्या भांड्यांचा वापर.
सुरुवातीस चहा विक्रेत्यांना कागदी कपा ऐवजी आम्ही तुम्हाला मोफत स्टीलची भांडी देऊ तुम्ही ती वापरावीत असे सांगितले पण ती धुण्यासाठी पुरेसे पाणी मिळत नसल्याने तो प्रयोग थोडा मागे पडला. त्यानंतर भाजीविक्रेत्यांना कोटिंग असलेल्या कपातून चहा किंवा गरम पेय घेतल्यामुळे आरोग्यास कसा धोका निर्माण होण्याची शक्यता असते आहे ते पटवून दिले. त्यांना स्टीलची भांडी मोफत देण्यात आली आणि ते भांडी वापरू लागले. त्यामुळे या प्रयोगाला उत्तम प्रतिसाद मिळाला. असाच प्रयोग त्यांनी रिक्षा दादांच्या बाबतीतही केला. त्यांनीही कागदी कपा ऐवजी हे स्टीलचे भांडे वापरुन त्याला चांगला प्रतिसाद दिला. थोड्या प्रमाणात का होईना पण कागदी कपांच्या ऐवजी स्टीलची भांडी वापरली जाऊ लागली त्यामुळे तयार होणारा कचरा काही अंशी कमी झाला. शाळेमध्ये निसर्ग संवर्धनाच्या कार्यक्रमा साठी जेव्हा प्लास्टिक कचरा मुक्तीची टीम जाते तेव्हा तेथील शिक्षकांना एक कापडी पिशवी आणि तीन ते चार स्टीलची भांडी भेट म्हणून दिली जातात.
तिसरा टप्पा हा खूपच महत्त्वाचा आहे. कारण त्यांनी एक नवीन संकल्पना आणली आणि त्याचे महत्त्व समाजाला पटवून देऊन ती यशस्वीरित्या आजही ती राबवत आहेत. त्या संकल्पनेचे नाव आहे 'स्टील भांडी बँक'. आपल्या घरात एखादा छोटासा कार्यक्रम असतो त्यावेळी आपण कागदी डिश किंवा कागदी ताटांचा वापर करतो. तो टाळण्यासाठी स्टील भांडी बँक सुरू झाली. इथे तुम्हाला नाष्टा व जेवण यांचा सेट मिळतो.
यासाठी तुम्हाला एक छोटीशी अनामत रक्कम द्यावी लागते ती रक्कम आपण भांडी परत दिल्यावर परतही मिळते. सध्या कोल्हापूर शहरात सात ठिकाणी आणि कोल्हापूर जिल्ह्यात तीन ठिकाणी ही बँक कार्यरत आहे. कोल्हापूर मधील प्रत्येक वॉर्ड मध्ये अशी बँक सुरू करण्याचा विदुला मॅडम यांचा मानस आहे. त्यांच्या या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे आणि युज अँड थ्रो चा कचरा कमी होण्यास हातभारही लागत आहे.
जेव्हा जेव्हा त्यांच्या या उपक्रमाबद्दल कौतुक होते तेव्हा हे सर्व कष्ट आणि यश हे माझ्या एकटीचे नसून हे आमच्या टीमचे आहे असे वारंवार विदुला मॅडम सांगतात.
प्रकाशझोतापासून लांब राहून सतत पर्यावरण संवर्धनात नवनवीन कल्पना राबवणाऱ्या विदुला मॅडमना माझे शतशः नमन.
चिदंबर नीलकंठ शिंदे
पेपर्स एन शेपर्स
कोल्हापूर
#नवदुर्गा
26/09/2025
विद्या विकास सावंत
शासकीय अधिकारी म्हटलं की आपल्यासमोर एक ठराविक प्रतिमा उभी राहते पण एखाद्या सिनेमातला प्रामाणिक अधिकारी बघितल्यावर आपल्याला जो आनंद मिळतो तो मला विद्याताईंना भेटल्यावर झाला.
नेसरी येथील शिपुर गावात वाढलेल्या विद्या ताईंची नाळ ही लहानपणापासूनच निसर्गाशी जोडली गेली होती. प्राथमिक शिक्षण शिपुर मध्ये झाल्यावर नंतर त्यांनी माध्यमिक व कॉलेज नेसरी मध्ये पूर्ण केले त्यानंतर कागल मध्ये एग्रीकल्चर चा डिप्लोमा पूर्ण केला ग्रामपंचायत अधिकारी म्हणून त्या कोकणात रुजू झाल्या. गिरोली, जाफरीगिरोली, गोलीवडे जाळे इथे काम केल्यावर सध्या त्या कागल तालुक्यातील खेबवडे गावात कार्यरत आहेत.
ज्या गावात त्या जातात तिथे त्या देशी व औषधी वृक्षांची लागवड, प्लास्टिक कचरा संकलन याचे काम सुरू करतात. त्याचबरोबर गावातील महिलांचे मेळावे घेऊन त्यांना प्लास्टिकचे दुष्परिणाम व त्यापासून होणाऱ्या आजारांची माहिती देतात कचऱ्याचे वर्गीकरण कसे करणे कापडी पिशवीचा वापर कसा वाढवला पाहिजे आणि तो का केला पाहिजे यासंदर्भातील माहिती तसेच सॅनिटरी पॅड ची विल्हेवाट योग्य रीतीने कशी करणे गरजेचे आहे यासारखे बरेच उपक्रम त्या घेत असतात.
जयश्री मॅडम यांच्याच प्रमाणे त्या ही नवीन पिढीकडे खूप आशेने बघतात. त्यामुळे वेळोवेळी शाळेत जाऊन वेगवेगळ्या स्पर्धा घेऊन निसर्ग रक्षणाचे महत्त्व त्या समजावून सांगतात आणि ग्रामपंचायतच्या मदतीतून विजेत्यांना योग्य ती बक्षीसही देतात जेणेकरून त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि निसर्ग संवर्धनासाठी ती मुले आणखीन काम करू लागतील.
सर्वसाधारणपणे खेडेगावात नवरात्राच्या दिवाळीच्या व यात्रेच्या आधी स्वच्छता जोरात होत असते त्यावेळी तो कचरा जमा होतो तो बहुधा गावाबाहेर असणाऱ्या नदी किंवा ओढ्यापाशी टाकला जातो हे विद्याताईंच्या लक्षात आल्यावर त्यांनी गावात दवंडी पिटवली ' गावात ट्रॅक्टर फिरवला जाईल आणि त्यातच कचरा टाकला पाहिजे' असे सांगितले गेले. नंतर त्यातील बऱ्यापैकी कचऱ्याचे वर्गीकरण करण्यात त्यांना यश आले.
त्यांच्या निसर्गसंवर्धनाच्या कामासाठी त्यांना यशवंत पंचायत राज, संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान, आर आर आबा पाटील सुंदर गाव, आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जिल्हा परिषद असे शासनाचे पुरस्कारही मिळालेले आहेत. विकासासाठी आपल्याकडे सुविधा कशा नाहीत हे बघत बसण्यापेक्षा ज्या सुविधा आहेत त्याचा पुरेपूर वापर करून काम करत राहणे हे त्यांचे ध्येय आहे.
अशा या निसर्ग रक्षणाचा ध्यास घेतलेल्या मातेला माझे शतशः नमन.
चिदंबर नीलकंठ शिंदे
पेपर्स एन शेपर्स
कोल्हापूर
#नवदुर्गा
Vidya Vikas Jadhav
Contact the business
Telephone
Website
Opening Hours
| Monday | 09:00 - 17:00 |
| Tuesday | 09:00 - 17:00 |
| Wednesday | 09:00 - 17:00 |
| Thursday | 09:00 - 17:00 |
| Friday | 09:00 - 17:00 |
| Saturday | 09:00 - 17:00 |